मा.आमदार बाळाराम पाटील ह्यांना महाराष्ट्र विधानपरिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी निवड.. .

मा.आमदार बाळाराम पाटील ह्यांना महाराष्ट्र विधानपरिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी निवड ...

पनवेल/प्रतिनिधी - महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदार संघाचे मा. आमदार बाळाराम पाटील आपल्या कार्यकर्तृत्वाने राज्यभर छाप सोडली आहे. एका कसलेल्या विधानपरिषद सदस्यासारखे त्यांनी सभागृह गाजवले. आता केवळ पनवेल विधानसभा मतदारसंघासाठीच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ही की मा. आमदार बाळाराम पाटील यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे सन २०२३ - २०२४ करिता महाराष्ट्र विधानपरिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी मा. आमदार बाळाराम पाटील यांना त्यासंबंधीचे पत्र लिहून माहिती कळवली आहे. 3 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता मुंबईतील विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मा. राष्ट्रपतींच्या हस्ते मा. आमदार पाटील यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यामुळे बाळाराम पाटील यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Popular posts
ग्रामस्थांची घरे वाचवण्यासाठी बाळाराम पाटिल आक्रमक
Image
कर्जत ते पनवेल होणार, नवीन 5 स्थानके *
Image
जेएनपीटी बंदराबाहेर ८५०० कंटेनर परदेशात जाण्यापासून रखडले
Image
*खारघरमधील ज्वेलर्स लुटून गोळीबार करत पळ काढणारे दरोडेखोर ताब्यात* *पनवेल/प्रतिनिधी:* नवी मुंबईतील खारघर पोलीस ठाणे हद्दीत सेक्टर नं. ३५ येथे असलेल्या बी. एम. ज्वेलर्समध्ये ३ हेल्मेट परिधान केलेल्या अज्ञात चोरांनी ११ लाख ८० हजार रुपयांचा दरोडा टाकला होता. भरगर्दीच्या वेळी दुचाकीवरून आलेल्या या ३ चोरांनी ज्वेलर्स तर लुटलेच मात्र पळून जाताना आपल्याकडे असलेल्या बंदुकीने हवेत गोळीबार देखील केला होता. यानंतर परिसरात भयंकर खळबळ माजली होती. लागलीच दिनांक २९ जुलै रोजी याबाबत खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य समजून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास सुरु केला. पोलीस पथकाने प्रथमतः घटनास्थळास तात्काळ भेट दिली. आरोपी येण्याच्या व जाण्याच्या मार्गावरील CCTV फुटेज मिळवले. या CCTV फुटेजची तब्बल ८ दिवस तपासणी करण्यात आली. त्यानंतर तांत्रिक तपासाव्दारे या गुन्हयात ४ आरोपींचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. लागलीच पोलिसांची विविध पथके सुरत, गुजरात उदयपुर, राजस्थान व रायगड जिल्हातील नेरळ, माथेरान या ठिकाणी आरोपींच्या मागावर रवाना झाली. अखेर पोलीस पथकाने रिझवान अलीशेख (वय २७ वर्षे) रा. सुरत, अझरुद्दीन हुसनोदीन शेख (वय २८ वर्षे) रा. सुरत, ताहा तनवीर परवेझ सिंधी (वय २१ वर्षे) रा. उदयपुर, राजस्थान आणि राजविर रामेश्वर कुमावत (वय २० वर्षे) रा. उदयपुर, राजस्थान या आरोपींना शिताफिने ताब्यात घेतले. यावेळी आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर गुन्हयात वापरण्यात आलेली २ अग्निशस्त्रे, ३ जीवंत काडतुसे, गुन्हा करताना वापरलेली दुचाकी आणि चोरीस गेलेली मालमत्ता देखील नागपाडा - मुंबई येथुन हस्तगत करण्यात आली आहे. या आरोपींना १६ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दिनांक २२ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खारघर पोलिसांनी या किचकट गुन्ह्याचा योग्य तपास लावून सर्व मुद्देमाल हस्तगत करत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Image